रविवार, १२ मार्च, २०२३

१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु

 केंद्र सरकार आणि राज्य शासन देशातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवित असतात.या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महाज्योती फ्री टॅबलेट योजना जी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्थेसोबत मिळून इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट देण्याची योजना सुरु केली आहे.
MH-CET / IEL / NEET या परीक्षांच्या २०२३ पूर्व तयारीसाठी इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.




१०वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकलसाठी तयारी करायची असते परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य नसते अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे.

जर तुम्हाला फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घायचा असेल तर शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करायची सर्व पद्धत आम्ही खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आपण हा लेख जरूर वाचावा व या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा

विशेष सूचना: आम्ही महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी विद्यार्थी असतील जे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना काय आहे, Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra, महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन अर्ज, महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे, महाज्योती फ्री टॅबलेट योजना वैशिष्ट्य काय आहेत, महाज्योती फ्री टॅबलेट योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र लाभ घेण्यासाठी किती टक्के गुणांची आवश्यकता आहे, फ्री टॅबलेट योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता काय आहे, फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत,संपर्क क्रमांक, फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

योजनेचे नावMahajyoti Free Tablet Yojana Maharashtra
विभागशिक्षण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजना कोणी सुरु केलीमहाज्योती संस्था
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी
लाभअभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट वितरण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र उद्देश

Mahajyoti Free Tablet Yojana Purpose

  • महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी इयत्ता ११वी सायन्स मध्ये प्रवेश घेतला आहे त्यांना ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षणासाठी मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.जेणेकरून विद्यार्थी घरी बसून स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • राज्यातील विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या सहाय्याने जीवनमान सुधारणे.
  • विद्यार्थ्यांना डिजिटल युगासोबत जोडणे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • राज्यात डिजिटली शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे
  • विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षा पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये

Maharashtra Free Tablet Yojana Features

  • या योजनेअंतर्गत १० वी पास झालेले विद्यार्थी ज्यांनी ११ वी सायन्स ला प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देण्यात येते आहेत तसेच ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी दररोज ६ GB इंटरनेट सुविधा आणि उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके देण्यात येत आहेत.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या टॅबलेट साठी विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत टॅबलेट चा लाभ दिला जातो.
  • महाज्योति फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनद्वारे करण्यात आली आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महाज्योती फ्री टॅबलेट योजना एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त अशी योजना आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यात 30 लाख विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप करण्याचा उद्देश्य निर्धारित करण्यात आलेला आहे.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींना देखील लाभ दिला जाणार आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्याने शैक्षणिक भविष्य सुधारण्यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळालेल्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देशातील विविध घडामोडींची माहिती मिळेल व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी

Mahajyoti Free Tablet Yojana Beneficiary

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता १०वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण

इयत्ता १०वीशहरी भागातील विद्यार्थी७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.
इयत्ता १०वीग्रामीण भागातील विद्यार्थी६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी
उत्तीर्ण झालेला असावा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना फायदे

  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज ६ GB इंटरनेट सेवा मोफत दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुस्तके दिली जाणार आहेत.
  • पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
  • या योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट चा वापर करून विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
  • टॅबलेट च्या साहाय्याने विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत तसेच आपल्या शिक्षकांसोबत अभ्यासासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी विविध प्रकारचे ऑनलाईन शिक्षण व कोर्से पूर्ण करू शकतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजना राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटली दुनियेत एक पाऊल पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महाज्योती फ्री टॅबलेट च्या अंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके डाउनलोड करून अभ्यास करू शकतील.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या टॅबलेट च्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःची इतर कामे सुद्धा करू शकतील

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आवश्यक पात्रता

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी इयत्ता १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या अटी

  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
  • शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता १०वी मध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.


महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

  • OBC (इ मा व)
  • VJNT (वि जा भ ज)
  • SBC (वि मा प्र)

महाज्योती फ्री टॅबलेट योजना कागदपत्रे

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा.
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • घरपट्टी
  • विज बिल
  • दहावी उत्तीर्ण मार्कशीट (ग्रामीण भागात ६० टक्के / शहरी भागात ७० टक्के)
  • विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
  • विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
  • नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्याने अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्याची पावती / पुरावा.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ई-मेल
  • मोबाईल क्रमांक

गुरुवार, ९ मार्च, २०२३

Pm किसान 6 हजार व राज्य शासन कडून 6 हजार असे 12हजार मिळेल

 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची





नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत.3 hours ago

बुधवार, १ मार्च, २०२३

Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25अर्ज सुरु

 सर्व पालकांना महत्वाची सुचना RTE २५% प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु 





आवश्यक कागदपत्रे

         1.      पत्त्याचा पुरावा

        2.      जन्मतारीख प्रमाणपत्र

        3.      आधार कार्ड

        4.    फोटो

        5.      जात प्रमाणपत्र

        6.      उत्पन्नाचे प्रमाणपत्र

        7.      अपंगत्व प्रमाणपत्र

या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज


 Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया लकरच सूरू होणारं आहे 

महत्वाची सूचना : आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्ज सर्व पालक भरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन site स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

♦ एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही .
♦ एका बालकाचा एका पेक्षा जास्त अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्म तारीख अथवा मोबाईल भरताना चुकल्यास तो अर्ज Delete करून पुन्हा नवीन अर्ज भरावा.

आरटीई 25% प्रवेशासाठी बालकांचे वय | RTE 25% Admission Age Limit
अ. क्र इयत्ता किमान वय कमाल वय
1 प्ले ग्रुप/ नर्सरी 3 वर्ष 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
2 ज्युनिअर केजी 4 वर्ष 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
3 सिनियर केजी 5 वर्ष 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
4 इयत्ता 1 ली 6 वर्ष 7 वर्ष 5 महिने 30 दिवस
 

आवश्यक कागदपत्रे (Required Documents List in Marathi)
Online अर्ज करतांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करायची नाहीये, मात्र ऑनलाइन अर्ज सादर करतांना पुढील कागदपत्रे जवळ असावीत.

1) रहिवाशी पुरावा
2) जन्म दाखला
3) जातीचा दाखला (वडिलांचा/बालकांचा)
4) उत्पन्न दाखला
5) दिव्यांग मुलांसाठी वैद्याकिय प्रमाणपत्र पुरावा
6) अनाथ असल्यास त्याचा पुरावा.

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना


1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (C) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थ साहित्य शाळा तसेच खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रिया करीता पालकांकडून विहित मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात आले आहेत.
2) आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकाला आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
3) 25% प्रवेश प्रक्रिये करिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी.
4) अर्ज करताना पालकांनी घराचे व शाळेचे अंतर किती आहे याची काळजी घ्यावी.
5) प्रवेश प्रक्रियेच्या विहित मुदतीमध्ये पालकांनी अर्ज करावा, जर का अर्ज करताना इंटरनेट अथवा तांत्रिक अडचणी येत असतील तर अशा परिस्थितीत शक्य तितका लवकर अर्ज करावा.
6) प्रवेश प्रक्रिये दरम्यान काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्याशी संपर्क करून समस्यांचे निराकरण करण्यात यावे.
7) पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी (उदा. घरचा पत्ता, जन्म तारीख, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, इतर.)
8) ज्या बालकांनी यापूर्वी आर टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
9) यापूर्वी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतलेले निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरण्याची निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही.
10) पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येऊ नयेत.


रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

(BSF) सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती

 Total: 26 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)18
2कॉन्स्टेबल (केनेलमन)08
Total26

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) व्हेटनरी स्टॉक असिस्टंट कोर्स   (iii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) सरकारी पशुवैद्यकीय प्राणी हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय कॉलेज किंवा सरकारी फार्म मध्ये हाताळणीचा दोन वर्षांचा अनुभव.

शारीरिक पात्रता:

उंची/छातीपुरुष महिला 
उंची165 से.मी. 150 से.मी.
छाती 76-81 से.मी.

वयाची अट: 20 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत



Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023  06 मार्च 2023

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

PM kisan 13th installment चे वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे

 PM kisan 13th installment चे वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.


देशातील गोर गरीब शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये अर्थ सहहाय देणारी एक महत्वाची योजना. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना २००० रुपयांच्या हप्त्याचा लाभ देत असतात अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.


या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या १3 व्या हप्त्याच वितरण 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीची जोडली गेलेली आहेत, राज्यात काही बँकांचे विलीनीकरण किंव्हा ईतर कारणाने IFSC code बदलले आहेत, परिणामी या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ ही मिळत नाही. त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहियाच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.

यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.

याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.

त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.

PM किसान E kyc खालील लिक वर जा

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

 तुमच्या PM किसा खात्या विषयी माहितीसाठी खालील लिंकवर जा 

https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


   https://chat.whatsapp.com/FRxJeOEEy3r2bCSCHDiI5R 





बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

वारसाची नोंद, ई – करार नोंदणी, बोजा चढविणे, बोजा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे आदी ७/१२ दुरुस्ती कामे आता सेतू वरून करून शकतात


खालील कामासाठी महा सेतू वरून अर्ज सादर करता येणार 

.                                



 १) वारसाची नोंद करणे

२) ई – करार नोंदणी. 

३) बोजा चढविणे.                                       

४) बोजा कमी करणे. 

५) मयताचे नाव कमी करणे.                          

६) अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करणे. 

७) एकत्र कुटुंब कर्ताची नोंद कमी करणे.         

८) विश्वस्तांचे नाव बदलणे 

९) संगणीकृत सात बारा मधील चूक दुरुस्ती करणे.


जाणून घ्या फेरफार म्हणजे काय

जमिनीच्या कामकाजात आपण किती वेळा फेरफार हा शब्द ऐकल असेल. पण बऱ्याच जणांना फेरफार म्हणजे काय किंवा त्याची नोंद कशी करावी या बद्दल माहीत नसण्याची शक्यता असते.

फेरफार म्हणजे गाव नमूना नंबर ६ मधील नोंदवाही ज्याला हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही पण म्हणतात.

या नोंदवाहित जमिनीचे सर्व व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच तलाठी कार्यालयात जावून होत असत. पण आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

ई- फेरफार प्रणालीद्वारे कोणते काम होणार.

ई- फेरफार प्रणालीमधून केलेल अर्ज तलाठयांना फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे. त्यामुळे तलाठयांना पुन्हा डाटा एंट्री करायची गरज पडणार नाही त्यामुळे त्यांचे काम खूप सोपे होणार आहे. 

फेरफारची नोंदणी कोण मंजूर करतात असा प्रश्न पडतो. काही जणांना असेही वाटत असेल कि फेरफाराची मंजुरू तलाठी करत असावेत पण असे होत नाही.

तलाठयाकडून फक्त फेरफाराची नोंदणी केली जाते. नोंदणी मंजूर करण्याचे काम मंडळ अधिकारी किंवा सर्कल भाऊसाहेब प्रणालीत करत असतात. सध्या तरी अशीच पद्धत आहे भविष्यामध्ये यामध्ये बदलही होऊ शकतो.

फेरफार कसा नोंदविला जातो

फेरफार नोंदणीसाठी चार स्तंभ आखले जातात. 

  • पहिल्या स्तंभात फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहिला जातो. 
  • दुसऱ्या स्तंभात हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकारचे स्वरूप लिहिले जाते. तचेच यामध्ये व्यवहाराचे स्वरूप, संबंधित खतेदारचे नाव, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम अशा बाबींचा पण समावेश असतो. 
  • तिसऱ्या स्तंभात जमिनीच्या व्यवहारासाठी लागणारे गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहिला जातो. 

चौथा स्तंभात फेरफारबद्दल संबंधीतांना नोटिस देवून, चौकशी करून केलेला फेरफार बरोबर आहे का याची खात्री केले जाते. संबंधित अधिकाऱ्यांचा आदेश या मध्ये देवून पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.  

सुलाई शासकीय योजना व नोकरीं विषयक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 


रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग योजना 👇*

*PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग योजना 👇*



1) बेकरी उद्योग

2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग 

3) बिस्किट निर्मिती उद्योग 

4) पोहा निर्मिती उद्योग 

5) काजू प्रक्रिया उद्योग 

6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग 

7) केक निर्मिती उद्योग 

8) चॉकलेट  निर्मिती उद्योग 

9) कोकोनट मिल्क प

वडर निर्मिती उद्योग 

10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग 

11) दलीया निर्मिती उद्योग 

12) डाळमिल 

13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग 

14) पिठाची गिरणी 

15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग 

16) फ्रुट ज्युस  निर्मिती उद्योग 

17) अद्रक - लसुण पेस्ट निर्मिती उद्योग 

18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग 

19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)

20) हिंग निर्मिती उद्योग 

21) मध  निर्मिती उद्योग 

22) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग 

23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग 

24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग 

25) जैम व जेली निर्मिती उद्योग 

26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग 

27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग 

28) सीलबंद पाणि उद्योग 

29) पाम तेल निर्मिती उद्योग

30) पनीर/चिज निर्मिती उद्योग 

31) पापड निर्मिती उद्योग 

32) पास्ता निर्मिती उद्योग 

33) लोणचे निर्मिती उद्योग 

34) आलू चिप्स निर्मिती उद्योग  

35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग 

36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग 

37) सोया चन्क निर्मिती उद्योग 

38) सोया सॉस निर्मिती उद्योग 

39) हळद / मसाले निर्मिती उद्योग 

40) शुगर कँडी निर्मिती उद्योग 

41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग 

42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग 

43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग 

44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग 

45) विनेगर निर्मिती उद्योग


*सदर उद्योगांकरिता 35% अनुदान उपलब्ध आहे.*


इच्छुक लाभार्थी यांनी आपआपली आवश्यक  कागदपत्रे खाली दर्शवलेल्या संसाधन व्यक्ती यांच्याकडे जमा करावी. 

तुमचा बँकेचा प्रस्ताव संबंधित संसाधन व्यक्ती तयार करतील. 

तसेच उद्योग स्थापनेबाबत मार्गदर्शन करतील. 

उद्योग स्थापन झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करतील.


*जर वरील यादी पैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल तर, त्या उद्योगाचे  विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा भेटेल.*


*लाभार्थी :-* 

1) वैयक्तिक लाभार्थी

(शेतीची अट नाही)

2) गट लाभार्थी

(महिला व पुरूष गट)

3) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)

4) भागीदार संस्था


*आवश्यक कागदपत्रे*


1) PAN Card

2) आधार कार्ड 

3) लाइट बिल 

4) बँक स्टेटमेंट 

5) मशिनरी कोटेशन (आवश्यक असल्यास)


अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आपल्या कृषी सहाय्यक साहेबांकडे द्यावे.


👉 अधिक माहितीसाठी संपर्क: 👈


🏛️ कृषि विज्ञान केंद्र, बारामती 🏛️


☎️ श्री.समाधान पानसरे: +91 97309 54897


☎️ श्री. अमोल पानसरे: +91 77749 45988



बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

कुसुम योजना

https://kusum.mahaurja.com/maintenancework/ 
 कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.

या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

  • सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
  • ३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  • शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

  • अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
  • बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
  • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • रेशन कार्ड
  • नोंदणी प्रत
  • प्राधिकरण पत्र
  • जमीन प्रत
  • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
  • मोबाइल नंबर
  • बँक खाते विवरण

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

या शेतकऱ्यांना PM किसान 13 हप्ता जमा होणार नाही

 पी एम किसान ई केवयसी करूनही जर आता जमा होत नसेल तर शेतकऱ्यांनी मग  बँक केवायसी बाकी असेल ती करून घ्यावी



 
सुलाई शासकीय योजनांचे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा 13 वा हफ्ता 15 फेब्रुवारी 2023

 मित्रांनो नमस्कार 



प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा 13 वा हफ्ता *15 फेब्रुवारी 2023*  रोजी  लाभार्त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. *कृषि आणि किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली* मार्फत मिळालेल्या माहितीनुसार भारतातील 1.46 करोड तसेच महाराष्ट्रातील 14,08,401 लाभार्त्यांना आधार seeded बँक अकाउंट नसल्याने प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचा लाभ मिळत नाही आहे. यात आपल्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील बऱ्याच लाभार्त्यांचा समावेश आहे. आपल्याला सदर लाभार्त्यांचे खाते *10 फेब्रुवारी 2023* पर्यंत उघडण्याचे काम सोपविण्यात आले आहे जेणेकरून 15 फेब्रुवारी 2023 च्या आत सर्व खातेदारांचे आधार seeding पूर्ण होईल व सदर खातेदारांच्या IPPB खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे प्रत्येकी 2000 रुपये जमा होतील.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधिचे अंतर्गत IPPB अकाउंट उघडण्यासाठी special mandate तयार करण्यात आले आहे. 

1. PM KISAN Premium  

आपल्या अंतर्गत असलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि लाभार्त्यांची यादी आपल्या सर्वांना लवकरच देण्यात येईल. सदर यादीमध्ये *लाभार्त्यांचे नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर* दिलेले आहेत. सर्वांना विनंती आहे कि यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्त्यांना लवकरात लवकर संपर्क करून त्यांचे IPPB अकाउंट  काढून घ्यावे. सदर IPPB अकाउंट *दिलेल्या mandate मध्येच* आणि *आधार seeding करूनच* उघडावेत व सदर योजनेचा लाभ न घेऊ शकणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांचा प्रधानमंत्री किसान सम्मान निधि मिळवून देण्यात मदत करावी. धन्यवाद.


डाक निरीक्षक

नंदुरबार सब डिव्हिजन

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

सौर कृषी पंप योजनेचा धुळे जिल्हाचा कोटा पूर्ण झाला आहे, फेक साईट वर फॉर्म भरू नये व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी किंवा मंजुरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये

धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे

 प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फोन कॉल द्वारे किंवा फेक मोबाईल एप्लीकेशन द्वारे व फेक साईट द्वारे पैसे जमा करण्याचे संदेश किंवा ऑनलाईन पेमेंट चे ऑप्शन शेतकऱ्यांची लूट होत आहे तरी शेतकऱ्यांनी सावधान राहावे धुळे जिल्ह्याचा कुसुमचा कोठा हा पूर्ण झाला आहे याची शेतकऱ्यानी नोद घ्यावी 

 प्रधानमंत्री कुसुम योजनेची लिंक 

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B



महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.

तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

आदेशानुसार



सुलाई शासकीय योजना व नोकरी मागर्दर्शन Whatsapp ग्रुप खालील लिंक

https://chat.whatsapp.com/L2Ucb7TRzNJ6gNWb6AmEx6


पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती

  पीकविमा भरपाई सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; पहा सर्व सविस्तर माहिती   भारतातील शेतकरी वर्गासाठी पीकविमा योजना (Crop Insurance Sch...